उपासमारीने कुटुंब उघड्यावर.! १०२ अंबुलन्स ड्रायव्हरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन...
![उपासमारीने कुटुंब उघड्यावर.! १०२ अंबुलन्स ड्रायव्हरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन...](https://news15marathi.com/uploads/images/202304/image_750x_6438d6d82ee6b.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : असलम शेख
लातूर : जिल्ह्यातील सर्व १०२ अंबुलन्स ड्रायव्हर यांना वेतनेतर अनुदान दिले जात नाही. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन, कुटुंब उघड्यावर आल्याने त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी लातूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे अंबुलन्स बंद ठेवण्याचा लेखी इशार दिला आहे.
निवेदनात दि. २७ डिसेंबर २०२१ रोजी पासून csc e -governance sevices India limited या कंपनी मार्फत वहान चालक म्हणून जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेमणूक झालेली आहे. आशा कर्मचाऱ्यांना वेतनेतर अनुदान दिले जाते हे वेतनत्तर आजर्यंत मिळाले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. यामुळे यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. तात्काळ वेतन द्यावे अन्यथा अंबुलन्स सेवा बंद ठेवण्याचा इशार ड्रायव्हर यांनी दीला आहे.
या निवेदनात जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रचे अंबुलन्स ड्रायव्हर पानचिंचोली संगादेव क्षिरसागर, खरोळा गजानन सोमवंशी, चापोली मनोज शिंदे, पानगाव जयदीप आचार्य, बोरी ईश्वर शिंदे, किनगाव विश्वजित वाहुळे, चापोली ( ब ) सुधाकर गायकवाड, जवळगा ( पो ) समाधान फत्तेपुरे, वलांडी नंदकुमार सोमवंशी, साकोळ युनुस नुरुने, हलगरा सोपान बोयणे, औराद (शा) बाबू मावले, पोहरेगाव नारगुंडे ओमकार, वाढवणा प्रेमदास राठोड, हंरगुळी सलमान पठाण, रामलिंग मुगदड गाजीबाबुमिया शेख आदी अंबुलन्स ड्रायव्हर यांच्या निवेदनावर सहया आहेत.