सरकारी कागदपत्रांवर आता वडिलांप्रमाणे आईचे नावही लागणार..!
![सरकारी कागदपत्रांवर आता वडिलांप्रमाणे आईचे नावही लागणार..!](https://news15marathi.com/uploads/images/202405/image_750x_663b929b99fc4.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी : महाराष्ट्र दिनापासून (१मे) पासून प्रत्येक सरकारी कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचेही नाव लिहिण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या धोरणानुसार यापुढे सर्व अधिकृत सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव लिहिणे बंधनकारक आहे.
यामध्ये शाळेचा दाखला, मालमत्तेचे उतारे, जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड,व पॅन कार्ड आधी विविध सरकारी आवश्यक कागदपत्रांचा समावेश करण्यात आला असून आतापर्यंत यावर मुलाच्या नावापुढे आईचे नाव नव्हते केवळ वडिलांचे नाव होते. आईचे नाव लिहिणे ऐच्छिक होते आता १मे पासून या सर्व कागदपत्रांवर आईचे नाव लिहावे लागणार आहे विशेष म्हणजे वडिलांच्या नावाआधी आईचे नाव असणार आहे.याशिवाय यापुढे १मे पासून जन्मणाऱ्या सर्व बालकांच्या नावाची नोंद करताना वडिलांच्या नावाआधी आईचे नाव लिहिणे बंधनकारक आहे.
नाव लिहिताना सुरुवातीला आईचे नाव त्यानंतर वडिलांचे नाव व शेवटी आडनाव लिहावे लागणार आहे जन्ममृत्यू दाखल्यास शैक्षणिक परीक्षा महसूल पगार पत्रक अशा विविध आठ कागदपत्रांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे मुला मुलींच्या विवाह नोंदणी प्रकार प्रमाणपत्रावरही आईचे नाव येणार आहे आधी केवळ वडिलांचे नाव असायचे मात्र आता त्यावर वधू-वरांच्या आई वडील अशा दोघांचे नाव लिहावी लागणार आहे.