नाम करणार आदिवासी भागातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर - नाना पाटेकर
![नाम करणार आदिवासी भागातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर - नाना पाटेकर](https://news15marathi.com/uploads/images/202403/image_750x_65e8409c3c000.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
नाम फाऊंडेशनने चार खडकवासला होतील एवढे पाणी अडवल असून, केवळ महाराष्ट्र नाही तर देशभर काम सुरू आहे. दिंडोरी पेठ सुरगाणा आदिवासी भागात जेथे पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे जेथे विवंचना आहे त्या समजावून घेण्यासाठी मी वारंवार येणार असल्याचे सांगत या परिसरात तिथे शक्य आहे तिथे छोटा मोठा तलाव बंधारे धरण बांधण्यासाठी नाम पुढाकार घेत; पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्याचा सर्वांच्या मदतीने प्रयत्न करू असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते नाम फाऊंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर यांनी केले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या पुढाकारातून नाम फाऊंडेशनचे अध्यक्ष, अभिनेते नाना पाटेकर यांनी दिंडोरी पेठ सुरगाणा भागात पाणी प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी दौरा केला. यावेळी झिरवाळ फाऊंडेशन तर्फे वनारे येथील झिरवाळ यांचे वस्तीवर कृषी आदिवासी सेवक पुरस्कार व इतर मान्यवरांचा सन्मान सोहळा पाटेकर यांचे हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.
नाम फाऊंडेशन तर्फे सुरू असलेल्या सुरगाणा तालुक्यातील म्हैसखडक येथील तीन बंधाऱ्यांची पाहणी पाटेकर यांनी केली. येथे १८ लाख लिटर पाण्याचे साठवण होणार आहे. पुढे बोलताना पाटेकर यांनी राजकारणात झिरवाळ यांचे सारखी जमिनीशी नाळ टिकवून ठेवलेली चांगणी माणसं आहे असे सांगत त्यांना आपण आहे असेच जनतेसाठी कार्यरत रहा असे सांगितले. शेतकऱ्यांनी एकत्र येत गटशेती करण्याची आवश्यकता आहे प्रत्येकाने आपले योगदान सामाजिक कार्यात द्या त्याचे निश्चित सार्थक होईल असे सांगत घरातून निघताना जात घराबाहेर आणू नका प्रामाणिक कार्य करा ते सार्थकी लागेल असे सांगितले. नागरिकांनी या भागात भरपूर पाऊस पडूनही पाणी दुर्भिक्ष असते त्यासाठी बंधारे बांधण्याची गरज व्यक्त करताच नाना यांनी प्रतेकाने स्वतः पासून तयारी करा प्रकल्पांचा जमीन उपलब्धता प्रश्न सोडवा आमची नाम संघटना त्वरित आपणास मदत करेल असे सांगितले.
स्वागत वनारेचे सरपंच दीपक झिरवाळ,गोकुळ झिरवाळ यांनी केले. यावेळी आदिवासी बचत गटाच्या विविध महिला सदस्यांनी ग्रामीण भागात बनविलेल्या भेटवस्तू नानांना देत त्यांचा सत्कार केला.नाना पाटेकर यांनी सर्व पुरस्कर्थी यांचा सत्कार करत त्यांना शाबासकी दिली.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.
कृषी भूषण पुरस्कार विजेते सुरेश कळमकर,सम्राट राऊत,दामोदर सानप,पुनम डोखळे यांचे सह एन.डी. ए मध्ये कॅप्टन म्हणून निवड झालेली शुभांगी चौधरी,धनुर्विद्या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वैष्णवी परदेशी आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त उद्धव मोरे,धोंडीराम थैल,रघुजी गवळी,ज्ञानेश्वर भोये,तनुजा चौधरी, साहित्य पुरस्कार प्राप्त उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ,मूर्तिकार विष्णू पवार,उद्योजिका सुमित्रा जाधव,उद्योजक पुरुषोत्तम गायकवाड,गोपीनाथ पाटील, गायक मिथुन कोंढवले, मयूर चव्हाण, मनोहर भसरे, विठ्ठल संधान,जवळके दिंडोरी च्या आमची आदर्श शाळा पुरस्कार विजेच्या सरपंच भारती जोंधळे आदी
चौकट
नानांनी जिंकली उपस्थितांची मने नाना पाटेकर हे सभास्थळी आले त्यावेळी तनुजा चौधरी ही विद्यार्थिनी शहीद सैनिकाची कहाणी सांगत होती त्यावेळी तिने सादरीकरण थांबवायचं नानांनी तिला तिचे सादरीकरण करायायला सुरू ठेवत व्यासपीठ खाली थांबत शांतपणे ऐकत सादरीकरणास दाद देत शाबासकी दिली तर आदिवासी सेवक पुरस्कार विजेते पुरस्कारती यांना व्यासपीठावर येणे शक्य नसल्याने त्यांना खुर्चीवर उचलून आणण्याचा प्रयत्न बघताच स्वतः व्यासपीठावरून खाली उतरत त्यांचा सन्मान केला सर्वच पुरस्कारथी यांची आस्थेने विचारपूस करत कुटुंबीयांना व्यासपीठावर बोलावून घेत त्यांचाही सन्मान केला त्यांच्या कृतीने सर्वांचीच मने नानांनी जिंकली.