सरकारकडून पुन्हा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या.! फडणवीस सरकारकडून बदल्यांचा धडाका चालूच...

NEWS15 MARATHI रिपोर्ट - महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यापासून आयएएस आणि आयपीएस प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाकाच लावला असून, राज्य सरकारकडून मागच्याच आठवड्यात 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर आता पुन्हा एकदा 4 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
सरकारकडून गेल्या पाच/सहा महिन्यांपासून बदल्यांचं सत्र सुरु आहे. गेल्याच आठवड्यात प्रशासनात मोठे बदल करताना आठ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.
राज्य सरकारने गेल्या आठवड्यात केलेल्या बदल्यांमध्ये आयएएस अधिकारी नितीन पाटील यांची राज्याच्या कापूस उत्पादक विपणन महासंघाच्या व्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली होती. तसेच आप्पासाहेब धुळाज यांच्याकडे राज्याच्या ओबीसी बहुजन कल्याण विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
नव्याने बदली झालेले अधिकारी खालील प्रमाणे.!
1. पराग सोमण (IAS:SCS:2014) मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई मेट्रो क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. सचिन कळंत्रे (IAS:SCS:2014) महापालिका आयुक्त, अमरावती महानगरपालिका, अमरावती यांची यशदा, पुणे येथील उपमहासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. सौम्या शर्मा-चांडक (IAS:RR:2018) मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नागपूर यांची महापालिका आयुक्त, अमरावती महानगरपालिका, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4. जिथिन रहमान (IAS:RR:2020) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.