#BREAKING || चंद्रपूरच्या जिल्हाधिकार्यांना अटक करण्याचे, महाराष्ट्राच्या DGP यांना आदेश.!
![#BREAKING || चंद्रपूरच्या जिल्हाधिकार्यांना अटक करण्याचे, महाराष्ट्राच्या DGP यांना आदेश.!](https://news15marathi.com/uploads/images/202302/image_750x_63f6f4fc394a8.jpg)
NEWS15 प्रतिनिधी - चंद्रपूर
आत्ताच्या घडीला प्रशाकीय वर्तुळातून एक मोठी घडामोड समोर आली असून, महाराष्ट्राचे DGP यांना; चक्क चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळं प्रशासनात जोरदार खळबळ उडाली आहे.
हे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने दिले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना हे आदेश प्राप्त झाले असून, आता जिल्हाधिकाऱ्यांना खरोखच अटक होणार की प्रशासकीय पातळीवर कायदे आणि नियमांचा अभ्यास करुन काही वेगळी भूमिका घेतली जाणार, याबाबत उत्सुकता आहे. परंतु, या देशामुळे प्रशासनात मात्र जोरदार खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिवती तालुक्यातील कुसुंबी या गावातील आदिवासींच्या जमीन प्रकरणात विनोद खोब्रागडे यांनी आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात जिल्हाधिकारी विनय गौडा यांना 16 फेब्रुवारीला आयोगापुढे हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र आयोगापुढे जिल्हाधिकारी स्वतः हजर झाले नाहीत, त्यांच्या जागी उपजिल्हाधिकारी तृप्ती सूर्यवंशी हजर झाल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना अटक करुन 2 मार्चपर्यंत आयोगापुढे सादर करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत.
पूर्वीच्या माणिकगड आणि आताच्या अल्ट्राटेक सिमेंट उद्योग समूहाने कुसुंबी येथील आदिवासींच्या जमिनींवर 36 वर्षांपासून अवैध कब्जा केल्याचा आरोप या पीडित आदिवासींचा आहे. आणि या प्रकरणात गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: हजर न होता उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठवून दिले. त्यामुळे आयोग संतप्त झाला. तसेच, ज्या अधिकाऱ्यांचा संबंध नाही ते या चौकशीसाठी का हजर राहिले, असा सवाल करत जिल्हाधिकाऱ्यांच्या अटकेचे आदेश काढण्यात आले. मात्र आयोगाने थेट जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश दिल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.