राज्यातील अंधारच संकट दूर? देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीने महाराष्ट्रात पुन्हा 'लाईट येणार...

NEWS15 रिपोर्ट : मुंबई
राज्यभरातील महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खासगीकरण आणि विविध मागण्यांसाह सरकार विरोधात 3 दिवसांचा संप पुकारला होता. यामुळे राज्यातील काही भागात सकाळ पासून वीज पुरवठा खंडीत झाला असून, आज अनेकांना अडचणीचा सामना करावा लागला आहे. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारकडून देण्यात आला होता.
परंतु, आज दुपारी (दि.04) वीज कर्मचारी आणि उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली असून, या बैठकीत वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला असल्याचे सांगण्यात आले आहे.
बैठकीनंतर काय म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस.!
काल रात्रीपासून विजेच्या तीनही कंपन्यानी व कर्मचाऱ्यांनी संपाची नोटीस देऊन संप सुरु केला होता. त्यांच्या मागण्यांबाबत आज कर्मचारी संघटनांशी बैठक झाली असून, 32 संघटना या चर्चेत सहभागी झाल्या होत्या. राज्य सरकारला या कंपन्यांचं कुठलंही खासगीकरण करायचं नाही हे स्पष्ट केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. याऊलट पुढच्या तीन वर्षात 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या तीन वीज कंपन्यांमध्ये राज्य सरकार करणार आहे. त्यामुळे खासगीकरण करण्याचा कोणताही विचार नाही असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
एका खासगी कंपनीने वीज परवान्यासाठी अर्ज दाखल केला. त्यांना परवाना मिळाल्यास वीज कंपन्यांवर त्याचा परिणाम होईल असं संघटनांचं म्हणणं होतं, पण ही त्या खासगी कंपनीचं नोटीफिकेशन होतं, आता MARC नोटीफिकेशन काढेल आणि आपली भूमिका स्पष्ट करेल असंही फडणवीस म्हणाले.