मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील प्रियकराने प्रियशीचा घात केला, विदारक घटनेने परिसरात खळबळ..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
आंबेगाव : पुणे जिल्ह्यातून फिरण्यासाठी गेलेल्या प्रेमीयुगलामध्ये क्षुल्लक कारणास्तव वाद झाला आणि चिडलेल्या प्रियकराने कोयत्याने वार करत प्रेयसीचे शीर धडावेगळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
प्रियकराने स्वतःहून पोलिसांसमोर जाऊन खुनाची कबुली दिली. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मधील वांबोरी परिसरातील (ता. राहुरी) विळद रोडवरील पिलेश्वर देवस्थान परिसरात असलेल्या गणपती मंदिरात जवळ बुधवारी (ता. १९) रोजी ही घटना घडली आहे. सोनाली राजू जाधव (वय २८ वर्षे), रा. पोखरी, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. सखाराम धोंडिबा वालकोळी (वय ५८ वर्षे), रा. निडगुरसर, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनील निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सखाराम हा प्रेयसी सोनाली सोबत बुधवारी (ता. १९)रोजी सायंकाळी सातच्या सुमारास वांबोरी परिसरातील पिलेश्वर देवस्थान मंदिर परिसरात गेले होते. यावेळी प्रेयसी सोनाली ही आरोपी सखारामकडे पैशाची मागणी करू लागली. मला पैसे दे नाहीतर मी पोलिसात तक्रार करेल, असे ती म्हणत होती. यावरून सोनाली व सखाराम यांच्यात वाद झाला. त्यानंतर सखारामने सोनाली हिच्या मानेवर कोयत्याने वार केला. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. कोयत्याचा वार इतका भयंकर होता की एका वारात सोनालीचे शीर धडावेगळे झाले. त्यानंतर आरोपी सखाराम वार केलेला कोयता घेऊन जवळपास चार किलोमीटर अंतर चालत रात्री दहाच्या सुमारास वांबोरी पोलिस दूरक्षेत्रात पोहोचला. तेथे त्याने स्वतःहुन फोन करून पोलिसांना बोलावून सर्व माहिती दिली. मी माझी प्रेयसी सोनालीला ठार मारले आहे. असे त्याने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी सोनाली हिचा मृतदेह पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वांबोरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. तेथून उत्तरीय तपासणीसाठी अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेमुळे वांबोरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बाहेरगावावरून आरोपी त्या ठिकाणी का आला होता? त्याने आपल्या प्रेयसीची हत्या नेमकी कोणत्या कारणावरून केली? फक्त पैशावरून वाद होता का? तो वांबोरीपर्यंत कोणत्या वाहनाने आला? या बाबतचा पुढील तपास राहुरी पोलिस ठाण्याचे पोलीस करत आहेत.
या प्रकरणामुळे आंबेगाव तालुक्यात खळबळ उडाली असून उलट सुलट चर्चा ना पेव फुटले आहे.