कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली...
![कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली...](https://news15marathi.com/uploads/images/202402/image_750x_65d1bf1127e2f.jpg)
NEWS15 मराठी रिपोर्ट.!
केंद्र सरकारने शेतकाऱ्याबाबत एक मोठा निर्णय घेतला असून, सरकारने कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी हटवली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समितीने कांदा निर्यातीला मान्यता दिली आहे. देशातील कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने त्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती आणि 31 मार्च 2024 ही अंतिम मुदत ठेवली होती.! परंतु, ही बंदी अंतिम मुदत संपण्यापूर्वीच हटवण्यात आली आहे.
बंदी उठवण्यामागची कारणे सांगितली तर गुजरात आणि महाराष्ट्रातील कांद्याचा साठा पाहता सरकारने ही मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना कांदा शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत माहिती दिली होती, त्यानंतर चर्चेनंतर बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
३ लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता
केंद्र सरकार कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याचा विचार करत असल्याची माहिती काही दिवसांपासून समोर येत होती. आता केंद्रीय मंत्र्यांच्या समितीने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून ३ लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिली आहे. यासोबतच बांगलादेशमध्ये ५० हजार टन कांदा निर्यातीलाही मान्यता देण्यात आली आहे. कांद्याचे उत्पादन घटल्याने भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. यामुळे केंद्र सरकारने ८ डिसेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी जाहीर केली होती. कांद्यावरील ही बंदी ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात कांद्याच्या दरात मोठी वाढ होऊन त्याचा भाव १०० रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. त्यानंतरा सरकारने निर्यात बंदी लागू केल्यानंतर कांद्याच्या दरात घसरण झाली होती.