मोठी बातमी : खराबवाडी गावातील नामांकित शाळेतील दोन विद्यार्थिनीच्या अपहरणाच्या बातमीने परिसरात खळबळ, पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरु..?

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : खराबवाडी गावातील नामांकित शाळेतील शनिवार(दि.२८)रोजी दुपारी दोन विद्यार्थिनीचं अपहरण झाल्याच्या बातमीने परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवार दुपारी शाळा सुटल्यानंतर दोन विद्यार्थिना एका पांढऱ्या एको गाडीत बळजबरीने ओढून बसवून नेल्याची घटना एका छोट्या मुलीने प्रत्येक्षात बघितली. त्यानंतर त्या मुलीने हि घटना तात्काळ शाळेच्या मुख्याध्यापक यांना येऊन सांगितली. यावर तात्काळ मुख्याध्यापक यांनी घटनेची माहिती महाळुंगे MIDC पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महाळुंगे MIDC पोलीस व गुन्हे शाखा युनिट ३ चे पथक शाळेच्या आवारात दाखल झाले आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासात असून कुठे काही अशी घटना घडली कि नाही याचाही तपास करत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार अजून तरी कोणत्याही पालकाची मुलींच्या अपहरणाच्या बद्द्द्ल तक्रार पोलीस ठाण्यात आलेली नाही. त्यामुळे अपहरणाची घटना घडली कि नाही यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. खरच अशी घटना घडली कि नाही? याची पडताळणी करण्यासाठी शाळा प्रशासनाकडून पालकांना फोना फोनी सुरु करण्यात आली आहे. महाळुंगे MIDC पोलीस व गुन्हे शाखा युनिट ३ चे पथकही परिसरात कसून चौकशी करत आहेत. शाळा व पोलीस प्रशासनाकडूनहि पालकांना आव्हान करण्यात येत आहे कि, आपली मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी आली आहे का? जर शाळा सुटल्यानंतर घरी आली नसेल तर तात्काळ शाळा प्रशासन किंवा महाळुंगे MIDC पोलिस ठाण्यात माहिती देण्याचे आव्हान पोलिसांनी केले आहे.
पालकांनीही आपली मुल शाळेतून वेळेत येतात का? शाळेत वेळेत जातात का? याची माहिती घेणे महत्वाचे आहे. त्याच बरोबर आपण एक सजक पालक म्हणून आपल्या मुलांच्या शाळेत जाऊन आपल्या मुलांची उपस्थिती आणि आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती कशी आहे याची माहिती घ्यायला हवी. फक्त मुल शाळेत जातात हा एकच अनुग्रह पालकांनी धरून चालनार नाही तर,एक जागृत पालक म्हणून आपली जबाबदारी पार पाडायला हवी.
वरील घटनेची कुणाला काही माहिती समजल्यास संपर्क करावा..
मुख्याध्यापक : ९८५०५६६२६६
महाळुंगे MIDC पोलीस ठाणे : ७०२८५३५३२३